जम्मू-कश्मीरच्या निवडणुकांनंतर…; योगी आदित्यनाथ यांनी केला मोठा दावा

सध्या देशाचं लक्षं लागलं आहे ते जम्मू-कश्मीर मध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं आहे. पुढील टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. एका सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे.

जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास पाकिस्तान व्याप्त कश्मीर (पीओके) जम्मू-कश्मीरचा भाग होईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. योगी आदित्यनाथ एका सभेत बोलताना म्हणाले की, पाकिस्तान लोकशाही वाचवण्यात अपयशी ठरला आहे. भिक मागणारा पाकिस्तान स्वतःलाच सांभाळू शकत नाही. त्यांना स्वत:चा देश वाचवायला मोठी करावी लागत आहे. त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर द्या, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केलं.