
हॉटेल भांडण प्रकरणात गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री मलायका अरोरा विरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अरोराला यापूर्वी साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र ती सुनावणीला उपस्थित राहिली नाही.
22 फेब्रुवारी 2012 रोजी, मुंबईतील ताज हॉटेलमधील वसाबी रेस्टॉरंटमध्ये सैफ अली खान आणि इतरांमध्ये शारीरिक हाणामारी झाली. मोठय़ाने होणाऱया गप्पांना आक्षेप घेतल्याने वाद झाला, ज्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचा समावेश होता. अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा लडाक हजर न राहिल्याने न्यायालयाने सुरुवातीला 15 मार्च रोजी जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 29 मार्च रोजी अमृताने साक्ष दिली, तर मलायका अनुपस्थित राहिली. तिच्या सततच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाने पुन्हा 5,000 रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केले व 29 एप्रिलपर्यंत वॉरंट अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.