Video – महाराष्ट्रातील अधिकची 39 लाख मतं आता बिहारमध्ये जाणार! – संजय राऊत

‘या देशाचा निवडणूक आयोग जर जिवंत असेल, त्यांच्यातला विवेक मेलेला नसेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी. मात्र निवडणूक आयोग याची उत्तरे देणार नाहीत, कारण निवडणूक आयोग हे स्थापन झालेल्या सरकारचा गुलाम झाला आहे. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला आवश्यकती माहिती दिली आहे. मात्र ते मेले आहेत. तसेच जी 39 लाख मतं आली आहेत ती कुठून आली आहेत आणि आता कुठे जाणार आहेत? तर ती आता बिहारमध्ये जाणार आहेत. ही फ्लोटिंग मतं आहेत. तिच नावं, तेच आधारकार्ड असेल, सगळं तसंच असेल. ते फिरत असतात. थोडे दिल्लीत आले आहेत. आता ही 39 लाख मतं बिहार मध्ये जातील. त्यानंतर उत्तर प्रदेशात जातील. हा एक नवा पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने हे लोक निवडणुका लढत आहेत आणि जिंकत आहेत’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.