
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर केल्यापासून राज्यातील आठ जिल्हा बँकांमध्ये तब्बल 101.18 कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. यात चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा असून त्याचे मूल्य शून्य आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून एप्रिल महिन्यात निकाल लागण्याची अपेक्षा बँकांना आहे. बँकांच्या लेखी ही रक्कम शिल्लक असली तरी आठ वर्षांपासून त्याचा निर्णय लागत नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25.3 कोटी रुपये इतकी रक्कम आहे.