दहा दिवस दप्तराविना; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीसाठी उपक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तराविना शिक्षण होणार आहे. या दहा दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत. शाळांनी आपल्या सोयीनुसार वर्षभरात केव्हाही हा उपक्रम राबवायचा आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यासह त्यांना व्यावहारिक कौशल्ये, हस्तकौशल्ये, अनुभवाधिष्ठत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने दहा दिवस दप्तराविना आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार नियमित अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे. भोपाळस्थित पीएसएस पेंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेने काही राज्यांतील शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. त्यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक काwशल्ये शिकण्यात रस असण्यासह दप्तराविना दिवसांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. विद्यार्थी सरासरी सहा तास आणि वर्षभरातील सुमारे एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ शाळेत असतात. किमान दहा दिवस किंवा साठ तास दप्तराविना दहा दिवस उपक्रमासाठी द्यायचे आहेत.