केदारनाथ मार्गावर महाराष्ट्रातील दोन यात्रेकरूंचा मृत्यू

गौरीकुंड- केदारनाथ पादचारी मार्गावर आज मोठा अपघात घडला. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठय़ा प्रमाणावर मातीचा ढिगारा आणि दगड पादचारी मार्गावर कोसळला. या दुर्घटनेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. किशोर अरुण पराते (नागपूर), सुनील महादेव काळे (जालना) अशी मृतांची नावे आहेत.