
औसा हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका गोडाऊन मध्ये ठेवलेले शेतकऱ्यांचे तब्बत 100 क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. परंतु औसा पोलीस ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले पूर्ण सोयाबीन अवघ्या 24 तासात परत मिळाले.
लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाणे हद्दीत एमआयडीसी मधील गोडाऊन मधील 4 लाख 39 हजार 200 रुपयांच्या 100 क्विंटल सोयाबीनची चोरी झाली होती. अज्ञात चोरटे 200 कट्टे सोयाबीन दोन वाहनामध्ये टाकून पसार झाले होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर औसाचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. 200 कट्टे सोयाबीन आणि एक आयशर टेम्पो व एक बोलेरो जीप जप्त केली.
अभिषेक सुहास यादव (21), अवधूत भोळे (22), मनोज राजू खताळ (22), हनुमंत भैरवनाथ मुंड (39) अशी या आरोपींची नावे आहेत. या चौघांनाही अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. दरम्यान ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव सहायक फौजदार कांबळे पोलिस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद तुमकुटे,चामे, पाटील, भंडे ,मगर यांनी केली आहे.