मंत्रीपद न मिळालेल्या भाजप नेत्यांची नाराजी कायम; मुनगंटीवारांनी मनातली खदखद पुन्हा बोलून दाखवली

sudhir mungantiwar-expressed-his-inner-turmoil-again

भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने ते कमालीचे नाराज आहेत. त्यांची ही नाराजी यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला गेला त्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्या समोरच मुनगंटीवारांनी मनातील सल बोलून दाखवली. कोणत्याही प्रकारे आपला आवाज पक्षश्रेंष्ठींपर्यंत पोहोचावा अशी भावना त्यांच्या कृतीतून दिसत असल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात रंगली आहे.