आता महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल! शिवसेना महिला आघाडीचा खोके सरकारला इशारा

shiv-sena-ubt-women

गेल्या 2 वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षदा म्हात्रे आणि यशश्री शिंदे या महिलांना नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी खोके सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला.