![dr.shantishri pandit](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/dr.shantishri-pandit-696x447.jpg)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’ पेक्षाही डावे असल्याचे खळबळजनक वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगलं काम करू शकले,’ असंही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. शांतीश्री पंडित म्हणाल्या, दिल्लीतील ‘जेएनयू’ने आयआयएम, आयआयटींना क्रमवारीत मागे टाकले आहे. ‘जेएनयू’ला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून दिलेली मी पहिली ‘संघी’ आहे. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पदे मिळवतात. नंतर लपवाछपवी करतात. डाव्यांचे कथन मजबूत आहे. डावे लोकच क्रांतिकारी असू शकतात, असे आजपर्यंत पुढे आणले. मात्र, वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून हे कथन सुरू झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.