
वाढवणमध्ये मोठं पोर्ट येतंय. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे तिथल्या स्थानिक मच्छीमारांचं मोठय़ा प्रमाणामध्ये होणारं विस्थापन. या विस्थापित मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने कोणती ठोस योजना आखली आहे काय, असा सवाल करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मच्छीमारांच्या प्रश्नाला राज्यसभेत वाचा पह्डली.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वाढवण बंदराच्या संदर्भात मच्छीमार बांधवांचा प्रश्न उपस्थित केला. या पोर्टमुळे मच्छीमारांच्या रोजगारावर संक्रांत येणार आहे. रत्नागिरीमधील रिफायनरीमुळे विषारी पाणी समुद्रात मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्यांना पोर्ट आल्यानंतर नागरिकांना सामोरे जावे लागेल, मात्र अनेक कुटुंबं या प्रकल्पामुळे विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा सरकारने काय विचार केला आहे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पेंद्रीय मत्स्योद्योग विभागाचे मंत्री राय लल्लनसिंग राजीव रंजन ऊर्फ लल्लनसिंग यांनी सरकार मच्छीमार बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मोघम आश्वासन दिले. शंभर गावे आम्ही निर्धारित केली आहेत, असेही ते म्हणाले.