“जो पाखंडी आणि कपटी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निर्धार शिबीर पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे.