पावसामुळे उद्या रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढला आहे.नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.बऱ्याच ठिकाणी पुलावरुन पाणी वहात आहे. काही ठिकाणी गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये तसेच पूर्व दक्षता म्हणून उद्या सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासानाकडून घेण्यात आला आहे.