Raigad Accident – मुंबई-गोवा महामार्गावर दोन बस एकमेकींना धडकल्या, अपघातात 25 जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागोठणेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस एकमेकींवर धडकल्या. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईहून राजापूरला जाणारी बस आणि माणगावहून मुंबईकडे येणारी बस नागोठणेजवळ एकमेकींना समोरासमोर धडकल्या. या अपघातामुळे नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून चाकरमनी गावाकडे निघाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आधीच प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. त्यातच अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना आणखी त्रास सहन करावा लागला.