शहीद अग्निवीरांच्या कुटुंबीयांना 1 कोटी मिळालेलेच नाहीत, राहुल गांधी यांचा आरोप

‘शहीद’ अग्निवीरांच्या कुटुंबीयांना 1 कोटी नुकसान भरपाई दिली जाते असी धादांत खोटी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

एका शहीद अग्निवीराच्या वडिलांचा कथित व्हिडीओही राहुल गांधी यांनी एक्सवर आपल्या दाव्याच्या पृष्ट्यर्थ शेअर केला आहे. राजनाथ सिंह खोटे बोलत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राहुलयांनी केली आहे. राजनाथ सिंह यांनी दावा केला होता की, शहीद अग्निवीरांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्यात येते.