मुंबईतील आंदोलन हा मराठय़ांना बदनाम करण्याचा डाव; मनोज जरांगे यांचा आरोप

राज्यात सध्या कुठेही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू नसताना मुंबईत ‘मातोश्री’समोर अचानक आंदोलन कसेकाय सुरू झाले, असा सवाल करत मनोज जरांगे-पाटील यांनी हा मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा डाव असल्याचा आरोप केला. हे अभियान दरेकरांचे असावे, असेही जरांगे म्हणाले.

14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यावर निर्णय होईल, असेही जरांगे म्हणाले.