मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्याने कांदा उत्पादकांवर संकट

वातावरणीय बदल आणि कीटकनाशकांच्या अति वापरामुळे मधमाश्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. कांदा लागवड आणि बीज उत्पादनासाठी परागीकरण अत्यंत महत्त्वाचे असते, कारण याच्या मदतीनेच बीजोत्पादन वाढते. मात्र, मधमाश्यांचे प्रमाण कमी होत असल्याने महाराष्ट्रातील बीजउत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

परागीभवन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यात परागकण एका फुलाच्या मकरंधकोषापासून दुसऱ्या फुलाच्या स्त्रीकेंद्राशी पोहोचते. ही प्रक्रिया बहुतेक वेळी मधमाश्या, वारा किंवा इतर कीटक यांद्वारे केली जाते. परागीभवनामुळे वनस्पतींच्या प्रजनन प्रक्रियेस मदत होते, प्रजाती तयार होतात. मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. मधमाश्या परागीकरणासाठी महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. कांद्याच्या पिकासाठीदेखील परागीकरण महत्त्वाचे आहे. कारण, मधमाश्या व इतर कीटक परागीकरण करत असतात, ज्यामुळे उत्पादन वाढीस मदत होते.

मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या बियांची शेती केली जाते. आणि रब्बी हंगामात संपूर्ण राज्यभरात बीज उत्पादनासाठी लागवड होते. परंतु, यंदा मधमाश्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने नैसर्गिक परागीभवन कमी प्रमाणात होणार आहे. परिणामी, बीज उत्पादन घटण्याचा धोका आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. विपुल प्रमाणावर मधमाश्या असतील, तर त्या कांद्याच्या फुलोऱ्यावर बसून परागीकरण घडवून आणतात. यंदा नैसर्गिकरीत्या मधमाश्या उपलब्ध नसल्याने परागीभवन अपुऱ्या प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे.

मधमाश्या वाढवण्यासाठी पेट्या ठेवा

मधमाश्यांची पेटी शेतात अशा ठिकाणी ठेवावी जिथे हवामान सौम्य असावे आणि पर्यावरण सुरक्षित व निसर्गसुलभ असावे. कांद्याच्या पिकाच्या जवळ, ओपन एरियामध्ये मधमाश्यांची पेटी ठेवली तर ती अधिक कार्यक्षम होईल. कांद्याच्या फुलांवर मधमाश्या स्वाभाविकपणे आकर्षित होतात. मधमाश्या कांद्याच्या फुलांवर पराग पोहोचवून परागीकरण प्रक्रिया सक्षमपणे पूर्ण करतात. यामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.