![drowned drowned](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/06/drowned-696x447.jpg)
बकऱ्या चारून सायंकाळी घरी परतत असताना मुलगी पाय घसरून तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आई आणि भावाने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर गावातील अन्य दोन मुलांनी उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण तलावात बुडून मृत्यू पावले. गुजरातमधील पाटण जिल्ह्यात ही धक्कादायक घडली.
पाटणा तालुक्यातील वडावली गावात राहणारे एकाच कुटुंबातील तीन सदस्य बकऱ्या चारायला गेले होते. त्यांच्यासोबत गावातील एक मुलगा आणि मुलगीही होते. सायंकाळी बकरी चारून सर्वजण घरी परतत होते. यादरम्यान एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी चौघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तलावाजवळ चपला पाहून गावकऱ्यांना काहीतरी अघटित घडल्याचा अंदाज आला. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावातून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.