
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी येथील दोन्ही बोगद्यांतील पाणीगळती निघता निघेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांसमोर ही गळती थांबवण्याचे आव्हान आहे. येत्या दोन महिन्यांत ही गळती बंद करू, असा विश्वास विभागाला आहे. करोडो रुपयांचा खर्च करूनही गळती थांबत नसल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोडी बोगद्याच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र उन्हाळ्यातही बोगद्यात पाणी पाझरत असून ही गळती थोपवण्यासाठी सातत्याने दुरुस्तीवर करोडोंचा खर्च करूनही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचा प्रयत्न पह्ल ठरत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार पंपनी तज्ञांकडून मार्गदर्शन घेत आहे. कशेडी बोगद्याच्या निर्मितीसाठी कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत, परंतु येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तज्ञांनी अभियांत्रिकी काwशल्य पणाला लावून काम केले असले तरी बोगद्यातून पाण्याची गळती थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गळती रोखण्यासाठी ‘ग्राऊटिंग’ तंत्रज्ञानाचा वापरही पह्लच उरला आहे. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. याला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे.
बोगद्यातून गळती लागल्यानंतर मुंबई आयआयटीचे प्रा. एस. के. यांनीही बोगद्याची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचनाही केल्या होत्या. तज्ञांच्या सल्ल्यानंतर बांधकाम विभागाने गळती रोखण्यासाठी उपाययोजना केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आता कडक उन्हाळा असूनही बोगद्यात गळती सुरूच असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेतदेखील गळती लागल्याचे दिसून येत आहे. या गळतीवर ठोस उपाययोजना व्हावी अशी मागणी आता वाहन चालकांमधून जोर धरू लागली आहे.
एक ते दोन महिन्यांत सर्व कामे मार्गी
महामार्गावरील या दोन्ही बोगद्यांत गळतीच्या ठिकाणी राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून गळती थांबवण्यासाठी काम सुरू आहे. जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये संपूर्णपणे गळती बंद होईल यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.