असलं रडकं सरकार बघितलं नाही – मनोज जरांगे

असलं रडकं सरकार कधीच बघितलं नाही. फडणकीस खूप हुशार, चाणक्य आहेत असे वाटायचे. मात्र ते फक्त याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस करण्यात आणि फोडाफोडीत हुशार आहेत. त्यामुळे भाजपाचेच लोक त्यांचा कार्यक्रम लावणार आहेत. म्हणून मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. समाज तुमचा फायदा करेल. पण नाही दिले तर निवडणुकीत खेळ खल्लास, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

जरांगे म्हणाले की, तुम्हाला जर राज्यातील 50 ते 55 टक्के मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसेल तर ओबीसीतून आरक्षण द्या. मराठे दादागिरीला मोजत नाहीत, सगळ्यांची दादागिरी मोडीत काढणार आहेत. महाकिकास आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुठून आरक्षण मागणार? त्यांना काय प्रश्न विचारणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांची आशा तुमच्याकडून आहे. तुम्ही आरक्षण द्या, तुम्हाला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा झाला, कारण तुम्ही आरक्षण दिले नाही, असे ते म्हणाले.

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, थोड्या दिवसात ते बी येडं होतं की काय? माझे एकच म्हणणे आहे, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील, तुम्ही नाही दिले की निवडणुकीत खेळ खल्लास करतील, असा इशारा त्यांनी दिला.