बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला…; गणरायाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवसांच्या बाप्पांना भक्तीभावात निरोप दिल्यानंतर आता मंगळवारी 10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पांना निरोप देताना भक्तांना हुरहूर लागत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षई लवकर या, अशी विनवणी करत बाप्पांना भक्तीभावात निरोप देण्याची तयारी पूर्म करण्यात आली आहे.

राज्यातील 10 दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी भक्तीभावात विसर्जन करण्यात येणार आहे. बप्पााना निरोप देताना सोमवारी अनेक मंडळांनी भजन, पूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच आता झाले भजन, आम्ही नमितो तव चरण…गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष अनेक मंडळात सुरू होता. बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात उत्साह असतो, तसाच विसर्जनासाठीही मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलावासंह निर्माल्य कलश आणि इतर तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी राज्यात मोठ्या संख्यने पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

यंदा डीजे आणि लेझर लाईटमुळे काही जणांना इजा झाली होती. त्यामुळे डीजे आणि लेझरवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठीही मंडळांना अवाहन करण्यात आले आहे. मुंबईत 12२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार ठेवले आहेत. विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापनासाठीही प्रशासनाने तयारी केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 244 सार्वजनिक गणपतींसह आठ हजारांहून घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर ठाणे जिल्ह्यात 45 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांत 168 सार्वजनिक, तर 14,330 घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.रायगड जिल्ह्यात 17 हजार 359 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.