महानंदचे पुनरुज्जीवन एनडीडीबी करणार

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) मुंबईचे पुनरुज्जीवन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) करणार आहे. त्यासाठी एनडीडीबीने राज्य सरकारकडे 253.57 कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारने ही रक्कम भागभांडवलाच्या स्वरूपात देण्याचे मान्य केले आहे. आर्थिक गैरप्रकारांमुळे तोटय़ात गेलेल्या महानंदचे व्यवस्थापन आणि प्रचालन गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या एनडीडीबीकडे सोपवण्यात आले आहे. एनडीडीबी 20-24-2025 ते 2028-29 या पाच वर्षांसाठी महानंदची प्रशासक म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्र्यांनी दिली. सचिन अहिर, विलास पोतनीस, सुनील शिंदे यांनी महानंदचे व्यवस्थापन एनडीडीबीकडे सोपवले आहे का, असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.