
जिल्ह्यातील काही भागात आज अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. अहमदपूर, उदगीर, चाकूर, जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
आंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे. शहर आणि तालुक्यात केशर आंबा ऐन भरात आला असताना वादळासह पाऊस येत असल्याने दुष्काळग्रस्त आणि डोंगरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वाढवणा बु. येथे शनिवार रोजी सकाळपासून तीव्र उष्णता जाणवत होती. मात्र सायंकाळी मेघगर्जनेसह 41 मिनिटं भरपूर पाऊस पडला. पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.