काजळी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद

काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.लांजा तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.पुराचे पाणी शेतात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज दुपारी साडेतीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.पुल बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.