साताऱ्यात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

हवामान विभागाने सातारा जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱया नागरिकांनी सतर्कता बाळगावी व स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाण्याचे टाळावे. पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नये व मोबाईलचा वापर करू नये. प्रवास करतेवेळी घाट रस्त्यावर विनाकारण थांबू नये. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.