तेलंगणात पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; 29 जिल्ह्यांना पावसाचा फटका

तेलंगणात पावसाने कहर केला आहे.पावसामुळे राज्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत झालेल्या पावसामुळे 33 पैकी 29 जिल्ह्यांना फटका बसला आहे.

पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना बचाव कार्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली जाईल. 29 मृतांची माहिती सरकारकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राज्यात नुकसानीचा झालेला आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 5 हजार 438  कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.