
सत्तेवर येताच कर्जमाफी करू असे आश्वासन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. मात्र राक्षसी बहुमत मिळवून सत्तेवर येताच सरकारने घुमजाव केले. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा आपल्या गळ्याभोवतीच दोरीचा फास अटकवून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. ही आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! सरकारने कुंभकर्णी झोपेतून आणि राक्षसी बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, असे ट्विट सपकाळ यांनी केले आहे.
“आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी”
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि… pic.twitter.com/D2hD3GgGft
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) April 12, 2025