Caste Census – जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? काँग्रेसने केंद्राला घेरलं

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. यातच जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याचबाबत बोलताना काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणतात की, “सरकार राहुल गांधींवर जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करण्याचा आरोप करत होते, मग आता सरकार जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करणार का?” ते म्हणाले की, “जे आजपर्यंत राहुल गांधींवर जातींच्या आधारावर लोकांना फूट पाडण्याचा आरोप करत होते, ते आता याला सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणतील.”

पवन खेरा म्हणाले की, “ही चौथी-पाचवी वेळ आहे जेव्हा त्यांनी (सरकारने) आधी राहुल गांधींच्या सूचनांचा विरोध केला आणि नंतर त्यावर सहमती दर्शवली. या लोकांना सरकार कसे चालवायचे हे माहित नाही.” पवन खेरा म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे जातनिहाय जनगणना आणि यासोबतच आणखी अनेक महत्वाची पावले उचलायची आहेत आणि उचलली पाहिजेत.”