महाकुंभात मौनी अमावस्येच्या पहाटे झालेल्या चेंगराचेंगरी 30 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या काही तासानंतरच भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संगमावर जाऊन अमृतस्नान केले. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. ते प्रकरण ताजे असतानाच हेमा मालिनी यांनी महाकुंभ येथे घडलेली चेंगराचेंगरी ही मोठी घटना नसून उगाचच या घटनेला ताणले जात आहे, असे वक्तव्य केलं आहे.
#WATCH | Delhi: BJP MP Hema Malini says “…We went to Kumbh, we had a very nice bath. It is right that an incident took place, but it was not a very big incident. I don’t know how big it was. It is being exaggerated…It was very well-managed, and everything was done very… pic.twitter.com/qIuEZ045Um
— ANI (@ANI) February 4, 2025
विरोधात बोलणं हे विरोधकांचे काम आहे. आम्ही कुंभला गेलेलो, सर्व काही व्यवस्थित होतं. ही घटना घडली आहे हे मान्य आहे पण एवढं मोठं काही झालेलं नाही. उगाचच प्रकरण ताणले जात आहे, असे हेमा मालिनी म्हणाल्या. एएनआयशी बोलताना हेमा मालिनी यांनी हे वक्तव्य केलं आहे.