वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत. ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी पंढरी गाठतात. अशा भाविकांच्या वाहनांसाठी 3 जुलै ते 21 जुलैदरम्यान राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे. फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांना ही सवलत लागू असून पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांनादेखील सवलत लागू असेल. त्यासाठी वारकऱयांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील.
महापालिकेतील वारसा हक्क नोकरी बंद होणार नाही.