
केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरवर देखील ही दरवाढ लागू होणार आहे. त्यावरून सध्या केंद्रातील एनडीए सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”आज घरगुती गॅस ५० रुपयांनी वाढला. भक्तांनी औरंगजेबाची कबर खणावी.. समाधी समाधी करावं.. आणि लोकांचे खिसे कापणाऱ्या या असल्या निर्णयाचे स्वागत करावं.. बोला जय श्रीराम! जय जय श्रीराम!”, असे ट्विट दानवे यांनी केले आहे.