निवडणूक न होताच दिल्लीत बसणार भाजपचा महापौर, आपने केला गंभीर आरोप

दिल्लीची महापौर निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचा विजय झाला आहे. कारण या निवडणूकीत आम आदमी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. पण आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपने यापूर्वीही दिल्ली महानगरपालिका निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वॉर्डांची पुर्नरचना इकडे तिकडे केल्या, तसेच यात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही भारद्वाज यांनी केला.

आता भाजपकडे नायब राज्यपाल आहे, त्यांच्याकडे दिल्ली महानगरपालिका आहे इतकंच नाही तर भाजपकडे आता दिल्ली विधानसभेची सत्ताही आहे असेही भारद्वाज म्हणाले.