
काही लोक जे थोडेफार जास्त वाचलेले आणि सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात. त्यांच्या विधानांतून त्यांची मानसिकता प्रतिबिंबित होते, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना अनुल्लेखाने टोला लगावला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी शिवसेनेला सोडले आणि गोरक्षकांसारखे स्वत:चे रक्षण करण्यासाठी पळून गेले त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची घाणेरडी राजकारणी बाजू उघड केली, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. सत्तेचा स्वत:च्या फायद्यासाठी असा दुरुपयोग यापूर्वी देश आणि समाजाने कधीच पाहिला नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
When one reflects on some of those who left us, ran away to safeguard themselves like dirt bag cowards, they truly exposed their dirty politician side.
But even after 3 years, the kind of statements they make and the misuse of power for their own benefit, the country and…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 23, 2025