टेक ऑफ करण्यापूर्वी फ्लाइटमध्ये अचानक निघाला धूर, 142 प्रवाशांचा जीव टांगणीला

केरळमधील तिरुवनंतपूरम विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटमध्ये उड्डाण करण्यापूर्वी स्मोक अलार्म वाजला. मस्कतला जाणाऱ्या या विमानात 142 प्रवासी होते. त्यांच्या सुरक्षेची जाणीव ठेवून विमान तातडीने परत आणण्यात आले. आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. विमान कंपनीने पर्यायी विमानाची व्यवस्था करून तपास सुरू केला आहे.

तिरुअनंतपूरम विमानतळावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात टळला. एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये अचानक धूर दिसला आणि अलार्म वाजला. यामुळे विमान टेकऑफच्या आधी थांबवून परत आणण्यात आले. हे विमान तिरुअनंतपूरमहून मस्कतला जाणार होते. त्यात 142 प्रवासी होते. एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. दरम्यान, अचानक स्मोक अलार्म वाजला. आणि विमानात धूर दिसल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला गेला.

विमानतळ आणि एअरलाइन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण संशयास्पद वाटल्यावर सुरक्षेचा विचार करून विमान उड्डाण करण्यापूर्वी लगेचच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षित खाली उतरवण्यात आले आणि विमानाची चौकशी सुरू करण्यात आली.

एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जात आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करता येईल. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, जेणेकरून धुराचे कारण काय हे स्पष्ट होईल, असे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले.