Pahalgam Terror Attack – आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय उर्दूसुद्धा शिकवली पाहिजे!

पहलगाम हल्ल्यानंतर अवघा देश सुन्न असताना मिंधे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अजब तर्कट मांडले आहे. दहशतवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय तर उर्दू भाषाही राज्यात शिकवली गेली पाहिजे, असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले.