
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांनी प्राण गमावले. प्राण गमावणाऱ्या पर्यटकांमध्ये राजस्थानमधील नीरज उधवानी देखील होतो. 34 वर्षांचा नीरज हा जयपूरचा रहिवासी असून, पत्नी आयुषीसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी हिंदुस्थानात आला होता. दुबईमधून एका लग्नासाठी हिंदुस्थानात आलेला नीरजचा शेवट अखेर पहलगाममधील एका दहशतवाद्याच्या गोळीने झाला. 21 एप्रिलपासून सुरू झालेला त्यांचा काश्मीर दौरा 22 एप्रिलच्या दुपारी दहशतवाद्यांच्या गोळीबाराच्या आवाजाने कायमचा संपला.
मृतांच्या यादीत सर्वीत आधी नीरज उधवानी हा उत्तराखंडचा आहे असे सांगण्यात येत होते. परंतु उत्तराखंड सरकारने स्पष्टीकरण करून म्हटले आहे की, मृत उत्तराखंडचा नाही. यानंतर, नीरज हा जयपूरच्या मॉडेल टाउन (मालवीय नगर) परिसरातील रहिवासी असल्याची खरी माहिती समोर आली.
Pahalagam Terror Attack- पहलगाममध्ये घोडेस्वारी करु नको असे सांगुनही बितान गेला.. आणि घात झाला
दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नीरजच्या जयपूरमधील घरी शोककळा पसरली आहे. इथे आई ज्योती उधवानी यांची परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे म्हटले जात आहे. त्या वारंवार म्हणत आहे की, माझ्या मुलाच्या मृत्यूला कोणी जबाबदार आहे का? आमचा मुलगा सुट्टीवर गेला म्हणून आमच्यापासून हिरावून घेण्यात आला? ज्योती म्हणतात की, २१ एप्रिलच्या रात्री शेवटचं मुलाशी आणि सुनेशी बोलणं झालं होतं.. तो म्हणत होता की, काश्मीरचा दौरा झाल्यानंतर तो आम्हाला भेटायला येईल. पण आता फक्त त्याच्या आठवणी उरल्या आहेत.
नीरज लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हिंदुस्थानात आला होता. नीरजचे काका भगवान दास उधवानी सांगितले की, तो दुबईमध्ये राहतो आणि तिथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतो. तो शिमला येथील एका लग्नात सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानात आला होता. तो आणि त्याची पत्नी आयुषी, दुबईत राहणाऱ्या त्याच्या काही मित्रांसह, एका लग्नात सहभागी होण्यासाठी शिमलाला गेले होते. लग्नानंतर नीरज आणि त्याची पत्नी काही दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी पहलगामला गेले. काही दिवसांनी नीरज दुबईला परतणार होता. नीरज आणि आयुषीचे लग्न फेब्रुवारी २०२३ मध्ये पुष्कर येथील भंवर सिंह पॅलेसमध्ये झाले होते. मृत नीरजचा मोठा भाऊ किशोर उधवानी हा आयकर विभागात कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना त्यांनी सांगितले की, दहशतवादी घटनेची माहिती मिळताच आम्ही आमच्या संपर्कातून प्रशासनाकडे मदत मागितली. आता नीरजचा मृतदेह दिल्लीमार्गे जयपूरला आणला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.