प्रत्येक हिंदूचे रक्षण करण्यास वचनबद्ध! – योगी आदित्यनाथ

आपल्याला प्रत्येक हिंदूचे रक्षण करावे लागेल. भाजप यासाठी वचनबद्ध आहे. म्हणून नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने त्याला विरोध केला. हा तोच पक्ष आहे जो दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेतो, असेही ते म्हणाले. रविवारी एका कार्यशाळेत ते बोलत होते.

वक्फच्या नावाखाली लाखो एकर जमीन बळकावण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तीन हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना घराबाहेर ओढून  नेण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. हे लोक कोण आहेत? हेच दलित, वंचित आणि गरीब हिंदू आहेत ज्यांना या भूमीचा सर्वाधिक फायदा होणार आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.