
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत व त्यानंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भोजणासाठी जाणार आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
”कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लम नाही. 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आठवतो का ? त्याचे पुढे काय झाले ? काहीच नाही ना ? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम ! ED आणि ACB आता गुंडाळून टाका” अशी संतप्त प्रतिक्रीया दमानिया यांनी दिली आहे.