
विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि पृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाऊंडेशनने त्यांच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना ‘नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार’ तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना ‘समष्टी ऊलगुलान पुरस्कार’ जाहीर झाला. संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ ही प्रदान करण्यात येणार आहे.
‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळय़ाचे यंदा आठवे वर्ष आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत हा दोनदिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यावेळी सात मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात 50 वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर आणि आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे यांना ‘नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार’ने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, साहित्यिका डॉ. श्यामल गरुड यांना ‘समष्टी गोलपीठा पुरस्कार’, डॉ. अमोल देवळेकर यांना ‘समष्टी निर्मिक पुरस्कार’, तर अॅड. दिशा वाडेकर यांना ‘समष्टी मूकनायक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
सोहळय़ाचे आकर्षण
अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण, रसिका आणि पृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम, वरुण सुखराज, सुमेध, मयूरेश कोण्णूर यांचा आशीष शिंदे यांच्यासोबत संवाद, सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, अॅड. दिशा वाडेकर यांचा परिसंवाद , ‘तुही यत्ता पंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार, सत्यशोधक जलसाचे विशेष सादरीकरण, तसेच मालविका राज, सिद्धेश गौतम, पैलास खानजोडे, प्रशांत पुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर, विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण आदी कलाकारांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शन हे यंदाच्या सोहळय़ाचे वैशिष्टय़ आहे.