शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवले नाही, मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

आईने शाळेत जाण्यासाठी वेळेवर उठवले नाही याचा राग येऊन आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कसबा येथील शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृण्मयी गजेंद्र देशमुख (13) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून  तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील एका युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर संगमेश्वरजवळच्या कसबा येथील आठवीत शिकणाऱ्या मृण्मयी देशमुख या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेड का@न्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर  पोलीस उपविभागीय अधिकारी शिवपुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.