IND vs Nz कसोटी मालिका हरल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय, स्टार खेळाडूंनाही दिले आदेश

बंगळुरू व पुण्यातील कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत लाजिरवाणे पराभव झाल्यामुळे बीसीसीआय सध्या टीम इंडियातील खेळाडूंवर नाराज आहे. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच टीम इंडियाने हिंदुस्थानात मालिका गमावली आहे. त्यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना दिवाळीत विश्रांती न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खेळाडूंसाठी दोन सराव सत्रेही आयोजित करण्यात आली असून स्टार खेळाडूंना देखील या सत्रांमध्ये सराव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगळुरूला पराभवाची झळ बसलेला हिंदुस्थानी संघ पुणे कसोटीत उसळी मारेल, अशी अपेक्षा कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे फोल ठरली. पुण्यात हिंदुस्थानी फलंदाज पेटून उठण्याऐवजी न्यूझीलंडच्या फिरकीसमोर त्यांचा अक्षरशः कोळसा झाला.