उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे, काँग्रेस आमदारांचीही हीच इच्छा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. अमरावती येथे रविवारी पार पडलेल्या महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.

‘जे 50 कोटी घेऊन स्वत:च्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतात ते जनतेचे काय होणार. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री झालेले त्यांना सहन झालं नव्हतं. पण आता माझ्या मनातली इच्छा सांगते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण करायला हवीत, असं माझं मत आहे. पुढच्या काळात त्यांनीच मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.