फडणवीसांची महाराष्ट्रातून गच्छंती निश्चित, भाजपने दिल्लीत बंगला अलॉट केला

सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणे जवळजवळ अशक्यच आहे याची खात्री भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीतील पक्षांना झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची तर महाराष्ट्रातूनच गच्छंती करण्याची पुरती तयारी भाजपने केली आहे. म्हणूनच की काय त्यांना आतापासूनच दिल्लीत एक बंगला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीमधील नेत्यांमध्ये सध्या निराशा दिसून येत आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार याची खात्री त्यांना पटली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना भाजपने दिल्लीत जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. कदाचित फडणवीस यांच्यावर भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.