केजरीवाल यांच्या जामिनावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम’

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली की, देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला.

शरद पवार यांनी एक्सवर ट्विट करत लिहिले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती.