Rain Update : मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश भागांना गुरुवारी अतिमुसळधार पावसाने झोडपले असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या 24 तासात मुंबई , मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने याबाबत नागरिकांना मेसेज पाठवून सतर्क केले आहे.