Mumbai Rain Update : सर आली धावून, रस्ता गेला वाहून; तीन महिन्यापूर्वीच झाले होते काम

मुंबईतील अंधेरी सबवे ते जुन्या नागरदास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. पालिकेने तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम केले होते. मात्र रविवारी रात्री झालेल्या पावसात या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. डांबराचे मोठ मोठे तुकडे रस्त्याच्या आजूबाजूला पडले आहेत. त्यामुळे आता पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.