काही लोकं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात, त्यांनंतर ते… लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची जीभ घसरली

बिहारच्या रुपैली मतदार संघामध्ये 10 जुलै रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्या दरम्यान राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच नितीश कुमार एका सभेमध्ये संबोधीत करताना त्यांची जीभ घसरली. लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता ते म्हणाले, काही लोकं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात आणि त्यांनतर ते कुटुंबातच अडकून राहतात असे ते म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उमेदवार कलाधर मंडल याच्या प्रचारासाठी त्यांनी रुपौली येथे सभा घेतली.  त्यावेळी संबोधीत करताना नितीश कुमार यांनी लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्यावर घराणेशाहीवर बोलले. त्यानंतर राजदच्या उमेदवार बीमा भारती यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. बीमा भारती यांच्यावर टीका करताना बोलले की, बीमा यांना कसे बोलावे हे देखिल माहित नव्हते आणि त्यांना मंत्री बनवले होते. 3 वेळा माझ्याच पक्षातून आमदार झाल्या, मंत्री बनवण्याचा आग्रह केला. मात्र दुसऱ्याला संधी दिल्यावर मात्र त्या खासदार बनायला निघाल्या, मात्र निकाल आल्यानंतर त्या तिसऱ्या नंबरवर आल्या असे म्हणाले. पुढे ते म्हणाले, काही जणं नऊ नऊ मुलं जन्माला घालतात, त्यानंतर घराणेशाहीतच अडकून राहतात.