![rohit](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/rohit--696x447.jpg)
टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे देशभरातली क्रिकेट चाहत्यांची तब्बल 11 वर्षांची प्रतिक्षा संपली. या सामन्यानंतर जगभरातील टीम इंडियाच्या चाहत्यांनी जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवून, रॅली काढून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने बार्बाडोसच्या समुद्रकिनारी विश्वचषकासोबत फोटोशूट केले आहे.