राज्यांची संपत्ती लूटून गुजरातला पाठवली जात आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

प्रत्येक राज्यातली संपत्ती लुटून गुजरातला पाठवली जात आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारला महाराष्ट्रातले कंत्राटदार मिळत नाही का असेही वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येक राज्यातली संपत्ती लुटली जात आहे आणि ती गुजरातला पाठवली जात आहे. महाराष्ट्रातही तसेच होत आहे. महाराष्ट्रातले 80 टक्के कंत्राटदार हे गुजरातचे आहेत. त्यामुळे मराठी माणसांना त्रास होत आहे. या सरकारला महाराष्ट्रातले कंत्राटदार मिळत नाहीत का? गुजराती कंत्राटदारांना जमिनी दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातले लोक काय करणार असेही वडेट्टीवार म्हणाले.