मुंबई-गोवा किंवा मुंबई -नाशिक किंवा मुंबई- दिल्ली महामार्ग असो… रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे. या महामार्गांवरून जाताना सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडते. आता केंद्रीय मंत्र्याचीच गाडी रस्त्यावरील खड्डय़ात अडकल्याची घटना झारखंडमध्ये घडली. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आज झारखंडच्या बहरागोडा भागात दौऱयावर होते. त्यावेळी गाडी अचानक मुसळधार पावसात रस्त्यावरील खड्डय़ात अडकली. सुरक्षा रक्षकांनी शिवराज चौहान यांना गाडीतून बाहेर येण्याची विनंती केली. अखेर शिवराज सिंह चौहान हे भरपावसात आणि भररस्त्यात छत्रीच्या आधारे गाडीतून बाहेर आले. शेवटी सुरक्षा रक्षकांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर गाडी खड्डय़ातून बाहेर निघून मार्गस्थ झाली आणि सर्वच सुरक्षा रक्षकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.